छत्रपती संभाजी महाराज लिखित बुधभूषण
*बुधभूषण हा ग्रंथ संभाजी महाराजांच्या राजनैतिक विचारांचे प्रतिबिंब आहे. एकूणच शिवकालीन राजनीतीचा अनमोल ठेवा म्हणजे हा ग्रंथ आहे. या ग्रंथात एकूण तीन अध्याय आणि सुमारे साडेआठशे श्लोक आहेत. पहिला अध्याय उपोद्घात आहे. दुसरा अध्याय आहे राजनीति आणि तिसरा अध्याय आहे प्रकीर्णनीति,या ग्रंथातील काही श्लोक संभाजी महाराजांनी स्वतः रचलेले आहेत तर काही श्लोक त्यांनी अन्य संस्कृत ग्रंथांमधून संकलीत केलेले आहेत. यांत महाभारत, रामायण कामंदकीय नीतिसार, याज्ञवल्क्यस्मृति, चाणक्यनीति, मनुस्मृति इत्यादी ग्रंथातील अनेक श्लोक जसेच्या तसे घेतले आहेत.* *संभाजी महाराजांनी हा ग्रंथ वयाच्या अवघ्या पंधराव्या वर्षी लिहिला आहे. संभाजी महाराजांची प्रतिभा आणि विद्वता या दोन्ही गुणांची ओळख हा ग्रंथ वाचताना प्रत्येक पानावर होते.* *या ग्रंथाचा विषयच मुळात राजनीति म्हणजे राजकारण हा आहे. इतक्या लहान वयात देखील संभाजी महाराजांची राजनैतिक दृष्टी किती व्यापक आणि प्रगल्भ होती हे सुद्धा या ग्रंथाच्या अध्ययनाने आपल्या ध्यानात येते. राजकारण हा शब्द आज आपण ज्या अर्थाने वापरतो तो संभाजी महाराजांना अभिप्रेत नाही. राष्ट्राच्या ...